Sunday, June 26, 2016

shiv

शिव-सह्याद्री मासिक-वर्ष दुसरे-अंक पहिला-जानेवारी-२०१४

छत्रपती शिवाजी महाराज आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सहयाद्री हेच महारा­ष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य असं जरी म्हणलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे शक्तीपीठ तर सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार. महाराष्ट्र घडविला तो या दोघांनीच. सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले.बाराशेव्या शतकापासून भारतात प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री यांनी थोपवल्या.नुसत्या थोपवल्या नाही तर किती तरी शाह्या विकलांग करून शरपंजरी पाडल्या.बंगाल पासून इराण-इराक पर्यंत अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले,ते फक्त आणि फक्त शिवराय आणि सह्याद्री यांच्यामुळेच.
अश्या युगप्रवर्तक सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांना,आणि मूलाधार सह्याद्रीला "शिव-सह्याद्री" परिवाराचा त्रिवार मुजरा............ छत्रपती शिवाजी महाराज आणि मूलाधार सह्याद्रीला स्मरून हे ई -मासिक (PDF) सर्व “शिव-सह्याद्री” प्रेमींना अर्पण करतो...........
                                                                                                                                                                                                                                             :-रवी राजेंद्र पवार


"शिव-सह्याद्री" हे ई-मासिक प्रत्येक महिन्याला अगदी निशुल्क प्रसिद्ध केले जाते.संपूर्ण मासिक ओळखीच्या लोकांना फ़ॉरवर्ड करू शकता.जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत "शिव-सह्याद्री" विचार नेणे हेच आपले एकमात्र ध्येय आहे.
shiv shyadri

Tuesday, June 21, 2016

शिवनेरी

 शिवरायांचा पाळणा 

 जुन्नर येथील स्मारक 

 पहिला दरवाजा 
 जन्मस्थान 

 खिडकी महालातील 
 पीर दरवाजा 

Sunday, February 28, 2016

जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध



जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, अश्या परिस्थितीत जावळीकर चंद्ररावाला एकतर शिवाजीराजांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार अथवा पुढे कधीनाकधी या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघड होते. या मोऱ्यांनी महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी भाग व बहुतेक सातारा विभाग काबीज केला होता. कोकण व घाटमाथा यावरील सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.या कारणांमुळेच महाराजांचे जावळीकडे प्रारंभापासून लक्ष होते.

इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती हे आपण मागील प्रकरणात पहिले.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.
२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.
३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.
४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो. समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.
लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-
"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)
चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.
जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.
|| लेखनसीमा ||
रोहित पवार
संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
शककर्ते शिवराय - विजय देशमुख

Friday, February 26, 2016

शिवकालीन महाराष्ट्र(सन सन १६४७ ते सन १६५६)-जावळी प्रास्ताविक

जावळी प्रास्ताविक

सन १६४६ मधे शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरे घराण्यातील दत्तकपुत्राला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला होता. त्यामुळे नवीन चंद्रराव त्याच्याशी सलोख्याने वागेल अशी अपेक्षा करणे चुकीचे नव्हते. सन १६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे असलेल्या वाई परगण्यातला होता.
हणमंतरावाकडून जोर खोरे घेण्यासाठी अफजलखानने केलेली चाल पुढे सरकली नाही. ह्यानंतर मोरे घराण्याच्या हलचालींमुळे शिवरायांच्या मुलुखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला. मोरे त्याचे शेजारीच असल्याने त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते.
शिवरायांनी चंद्ररावला लिहीले होते की त्याने राजे ही पदवी वापरु नये व शिवरायांशि इमान राखावा. हा उल्लेख मोरे बखरीमधे सापडतो. ह्यावर चंद्ररावाच्या उत्तराने शिवरायानबरोबरचे संबंध धोक्यात आणले. त्यामुळे हे स्पष्ट होते की शिवरायांचे जावळीवरचे आक्रमण मुख्यतः राजकारणासाठीच होते.
सभासद बखरीत शिवरायांच्या जावळी युद्धाचे कारण स्पष्ट होते ...
चंद्रराव मोरे यांस मारल्याविरहित राज्य साधत नाही ।
सभासद बखर
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६

जावळीवर आक्रमण
शिवरायांकडे दहा हजारांचे सैन्य होते असे म्हटले आहे पण बहुदा ही अतिशयोक्ती असावी. जावळीवर एकाच वेळी दोन बाजूंनी आक्रमण करायची त्याची योजना होती. त्याने रडतोंडीच्या घाटाकडे एक टोळी पाठवली. तिला चंद्ररावाच्या लोकांनी अडविले. दुसरी मोठी टोळी घेऊन राजे स्वतः महाबळेश्वराच्या पठारावरुन निसाणी घाटाने जावळीकडे गेले .
१५ जानेवारी १६५६ ला जावळी शिवरायांकडे आली व ३० मार्च पर्यंत राजे तिथे राहिले . चंद्रराव मोरे जावळीतून निसटला व रायरीला, म्हणजे रायगडला गेला. जावळीमधे काही प्रतिकार झाला असावा ज्यामुळे शिवरायांना तिथे ३० मार्चपर्यंत राहावे लागले. राजे तिथे असताना त्याच्या लोकांनी रायरीलाही वेढा घातला असावा.
जावळी सोडल्यावर ६ एप्रिल १६५६ ला शिवाजी राजे रायरीला पोहोचले . त्यानंतर लगेच चंद्ररावाने हत्यार टाकले व कृष्णाजी व बाजी ह्या त्याच्या दोन मुलांसह त्याला बंदी बनविण्यात आले. बंदिवासातून चंद्ररावाने पळण्याचा प्रयत्न केला व त्याने घोरपडेला लिहीलेले पत्र शिवरायांनी अडविले. चंद्रराव व कृष्णाजीचा शिरच्छेद करण्यात आला व बहुदा त्याचा दुसरा मुलगा बाजी निसटला. हा उल्लेख मिरझा राजे जयसिंहने औरंगजेबला १६६५ मधे लिहीलेल्या पत्रात सापडतो.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६

 जावळी मोहिमेचा आढावा

शिवरायांनी जावळी घेण्याचा अतिशय धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते. जावळी घेतल्यावर त्यांना कोकणातली थेट वाट प्राप्त झाली. त्याच्या छोट्या सैन्याला व वेगवान हलचालींना अनुकूल आणि आदिलशाही व मुघलांसारख्या भल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकूल असा मोठा प्रदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधायला घेतला. फक्त तीन वर्षांनी त्याच ठिकाणी राजे अफजलवध करणार होते .
जावळी जिंकल्यावर लगेच प्रभावळीच्या सूर्यराव सुर्व्यांनी कोकणात शिवरायांची सत्ता मान्य केली. ह्यामुळे शिवरायांचा मुलुख आणखी वाढला. जंजीरेकर सिद्दीही आता शिवरायांचा शेजारी झाला. शिवरायांनी रायरीही जिंकला होता त्याचाच पुढे रायगड झाला, मराठा साम्राज्याची राजधानी. ह्या एका चालीने राजांना पुणे व आसपासच्या परिसराहून कितीतरी मोठ्या प्रदेशाचा मानकरी केले. ह्या चालीनंतर राजांना त्याच्या शेजाऱ्यांकडूनही मान मिळायला लागला.
जावळीतून रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला जो आजही अतिशय दाट व भयंकर अरण्यात लपलेला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवरायांना प्रथमच मोठा समुद्रकिनारा लाभला. त्यामुळे आरमारावर लक्ष देणे त्याला अनिवार्य होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जावळी जिंकणे हे त्याच्यासाठी फार मोठे पाऊल होते. राजाच्या छोट्या जाहगीरीला ह्यामुळे छोट्या राज्याचे स्वरुप मिळाले.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६

जावळी मोहिमेचे महत्व

सन १६५६ मधे मुघलांनी कुतुबशाहीवर आक्रमण केले होते. ह्या वादळाचे लोट त्यांच्या प्रदेशात येऊ नयेत म्हणून आदिलशाहीनेही त्यांचे सैन्य कुतुबशाही सीमेवर ठेवले होते. हा भाग जावळीपासून कित्येक दूर होता. त्यामुळे मुघल किंवा आदिलशाहीला जावळीतल्या घडामोडींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. तसेच शिवरायांना मोरे व आदिलशाहीमधे उडालेल्या खटक्यांची माहिती होती. त्यामुळे तशी वेळ आली असती तर जावळीवरचे त्यांचे आक्रमण आदिलशाहीसाठीच केले होते असे कारणही राजे पुढे करु शकत होते .
शिवरायांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जावळीवर आक्रमण केले असे ठामपणे सांगता येत नाही पण निश्चितपणे ती वेळ सुयोग्य होती. जावळीवरचे आक्रमण सुरु करण्यापूर्वी शिवरायांनी संभाजी कावजीला हणमंतरावाकडे असलेल्या जोर खोऱ्यावर चालून जायला सांगितले होते. त्यामुळे तिथुन शिवरायांवर वार होणार नाही ह्याची त्यांनी आधीच काळजी घेतली होती. ह्यातून अचूक योजना करण्याचे व ती पार पाडण्याचे शिवरायांचे कौशल्य आपल्याला दिसते.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७६९-७७३
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ १०४४-१०६६

शिवाजी राजे जावळी जिंकतात

सन १६५६ मधे जावळी जिंकून घेणे हा शिवरायांसाठी अतिशय महत्वाचा टप्पा होता. त्यामुळे कोकणातला त्यांचा संचार मुक्त झाला तसेच जंजीऱ्याचा सिद्दी आता त्यांचा शेजारी झाला. त्याच्या शत्रुंना भयभीत करेल अशी मोक्याची जागा जावळीने त्यांना दिली. तिथले दाट अरण्य व निर्मनुष्य विस्तृत जंगल सर्वपरिचित होते. प्रतापगड व रायगडासारखे भक्कम किल्लेही त्याला जावळीतूनच मिळाले. त्याबरोबर चंद्रगड, कमळगडासारखे इतर काही गडही त्याच्या वाट्याला आले.

शिवकालीन महाराष्ट्र-महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार





                                                   कोळी चौथरा, शिवनेरी
शिवनेरीच्या इतिहासात महादेव कोळी समाजाच्या क्रांतिकारी पर्वाची साक्ष देणारा हा चौथरा इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षितच राहिला आहे.

शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार

पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
• शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४
साभार :www.marathaempire.com

शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १६४७ ते सन १६५६ ) भाग १३४



                                       गोपाळभट श्रीधरभटाची महाबळेश्वर देवळात नेमणूक
महाबळेश्वर मंदिरात दिवाबत्ती व पुजेची व्यवस्था पाहण्यासाठी शिवरायांनी गोपाळभट श्रीधरभटाला नेमले होते. १८ फेब्रुवारी १६५३ च्या एका पत्रात हा उल्लेख सापडतो. पण नवीन संदर्भाप्रमाणे हे पत्र बनावट आहे. श्री राजाशिवछत्रपती ह्या पुस्तकात त्याचे पूर्ण स्पष्टीकरण सापडते. त्यातला सारांश खाली दिला आहे.
ह्या पत्राची तारीख हिंदू कालगणनेनुसार दिली आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाआधीची सर्व पत्रांवर हिजरी तारीख असते. त्यामुळे फक्त ह्या एकाच पत्रावर हिंदू पंचांगाप्रमाणे तारीख येणे अवघड आहे. दुसरे म्हणजे १८ फेब्रुवारी १६५३ ला शुक्रवार होता पण पत्रात रविवार असा उल्लेख दिला आहे.
हे पत्र बनावट असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे महाबळेश्वरचा भाग जावळीत येतो व १६५६ पर्यंत तो मोरे घराण्याकडे होता. म्हणजेच शिवरायांना सन १६५३ साली ह्या भागातल्या नेमणुका करण्याचा काही अधिकारच नव्हता. शिवरायांनी सन १६५६ मधे जावळी घेतल्यानंतरच त्यांना ह्या नेमणुका करता आल्या असत्या.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड २, पृष्ठ ९८७-९९२

सांभार :www.marathaempire.com

शिवाजी राजे पुरंदर ताब्यात घेतात



                                                      शिवाजी राजे पुरंदर ताब्यात घेतात
शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १६४७ ते सन १६५६ )
फतहखानने शिवरायांवर चाल केली तेव्हा पुरंदर किल्ला महादजी नीळकंठरावाकडे होता. महादजीचे शाहजीबरोबर चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी शिवरायांना संकटकाळी गडाचा वापर करु दिला. साधारण १६२५ पासून महादजीच्या घराण्याकडे पुरंदरचा ताबा होता. २० डिसेंबर १६२५ चा एक महजर आहे ज्यात पुरंदरच्या नीळकंठरावाचा उल्लेख येतो.
त्यातून हे स्पष्ट होते की मीरासदारीने नीळकंठरावांकडे पुरंदरचा ताबा होता. पुण्याच्या कऱ्हेपठार तरफेत पुरंदर किल्ला येतो. हा परगणा शाहजी राजांना मुकासा म्हणून मिळाला होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शाहजी राजांचा ह्या भागावर हक्क होता. तसेच शाहजी राजांचा प्रतिनिधी म्हणून शिवरायांचा त्या भागावर हक्क होता.
७ मे १६५४ च्या सुमारास महादजी नीळकंठरावाचा मृत्यू झाला. ह्या तारखेच्या शाहजी राजांनी महादजीच्या मुलांना लिहीलेल्या पत्रात महादजीच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला आहे. शाहजी राजांनी त्यात म्हटले आहे की महादजी बरोबर जसे सलोख्याचे संबंध होते तसेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांशीही चालू राहतील.
ह्यातून असे लक्षात येते की जरी शाहजी राजांकडे पुणे परगणा होता तरी पुरंदरवर त्याचा पूर्णाधिकार नव्हता. ९ ऑगस्ट १६५४ ला शिवरायांनी महादजीच्या थोरल्या मुलाला लिहीलेले एक पत्र उपलब्ध आहे. ह्या पत्रात शिवरायांचा पाठराखणीचा पण अधिकारी सूर दिसून येतो. महादजीच्या दुसऱ्या मुलाला, म्हणजे शंकरजीला गणेश नावाचा मुलगा होता. त्याने २४ मे १७३६ ते २३ मे १७३७ ह्या मधे केलेला एक अर्ज उपलब्ध आहे. त्यात शिवरायांनी पुरंदरचा ताबा घेतल्याची नोंद सापडते.
ह्या सगळ्या साधनातून असे दिसते की महादजीच्या मृत्यूनंतर शिवरायांनी पुरंदरचा ताबा घेतला. महादजीचा मुलगा नीळोपंत ह्याला शिवरायांनी विश्वासात घेऊन त्याला पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले होते. पुरंदरचे हस्तांतर ९ ऑगस्ट १६५४ ते मे १६५७ च्या मधे कधीतरी झाले असावे.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७३५-७४३

Wednesday, February 10, 2016

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३६

 

शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १६४७ ते सन १६५६ ) भाग १३६

कनकगिरीला संभाजी राजे ( शिवरायांचे मोठे भाऊ ) यांची समाधी

जिजाऊसाहेबांचा थोरला पुत्र ,शिवरायांचा थोरला भाऊ संभाजी राजा .याच थोरला भावाच्या नावावरून शिवरायांनी स्वताच्या मुलाचे नाव संभाजी ठेवले
कानगगिरीच्या युद्धात ,आदिलशाही सरदार अफजलखान ने केलेल्या दगल बाजी मुळे ,छत्रपती शिवरायांचे थोरला बंधू संभाजी राजे मारले गेले .त्यांची समाधी कर्नाटकात आहे .कर्नाटकात कनकगिरी नावाचे दोन गावे आहेत .ज्या कानगगिरीला कोट आहे .त्यात कनकगिरीत हि समाधी आहे मात्र शिव भक्तानो आणि शिव प्रेमिनो दुर्देवाने हेद्राबाद संस्थान विलीनिकारण्यात या समाधी चे दर्ग्यात रुपांतर झाले आहे

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३७



शाहजी राजांकडे सुपे परगणा होता. शाहजी राजे कर्नाटकात असल्याने त्याचा कारभार शाहजी राजाच्या मेहुण्याकडे म्हणजे, संभाजी मोहितेच्या हातात होता. शाहजी राजांची दुसरी पत्नी तुकाबाई ही संभाजीची बहीण होती. सन १६५६ मधे शिवरायांनी संभाजी मोहितेला अटक केले व सुप्याचा ताबा स्वतःकडे घेतला.
ही घटना जेधे शकावली व शिवापूर शकावलीत सापडते पण अटकेचे कारण त्यात दिले नाही. ह्या उपरांत संभाजी मोहितेचे काय झाले त्याचे काही संदर्भ अजून उपलब्ध नाहीत.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७७३-७७७

Saturday, February 6, 2016

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३८


सन १६४९ मधे शिवरायांनी दख्खनच्या मुघल सुभेदारला, म्हणजे शहजादा मुरादबक्षला काही पत्रे लिहीली होती. ह्यानंतर सन १६५६ पर्यंत त्याने मुघलांना काही लिहील्याचे पुरावे मिळत नाहीत. जुलै १६५६ मधे शिवरायांनी मुल्तफखान नावाच्या अहमदनगरच्या किल्लेदाराला पत्र लिहीले होते. हे पत्र आज उपलब्ध नाही पण ऑगस्ट १६५६ मधे औरंगजेबने मुल्तफखानला लिहीलेल्या पत्रात त्या पत्राचा संदर्भ येतो.२२ डिसेंबर १६५६ ला लिहीलेल्या औरंगजेबच्या दुसऱ्या पत्रातून असे लक्षात येते की शिवरायांनी मुघलांशी हा पत्रव्यवहार आदिलशाहीविरुद्ध त्याच्या आक्रमणांना पाठींबा मिळवण्यासाठी केला होता. ह्या पत्रात औरंगजेबने शिवाजी राजा व शाहजी राजाला लिहीलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे पण ती कुठलीच पत्रे आज उपलब्ध नाहीत. सन १६५७ मधे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला शिवरायांचा वकील औरंगजेबला भेटला होता. शिवरायांनी उत्तरादाखल दिलेले पत्र आज उपलब्ध नाही पण १५ मार्च १६५७ ला औरंगजेब ने मुल्कफखानला लिहीलेल्या पत्रात ही घटना दिला आहे. त्यानंतर औरंगजेबने शिवरायांना एक निशाण पाठविले व शिवरायांनी त्यालाही उत्तर दिले. ही दोन्ही पत्र आज उपलब्ध नाहीत पण २३ एप्रिल १६५७ ला औरंगजेबने शिवरायांना लिहीलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख आहे. ह्यातील शेवटच्या पत्राच्या एका आठवड्यानंतरच शिवरायांनी जुन्नर व अहमदनगर ही मुघलांची ठाणी लुटली.

संदर्भग्रंथ

 • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८१७-८२५

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३९

 शिवरायांचा मसुरवर हल्ला 
२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मासूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मासूरवरील छापा घातला असावा. शिवाजी राजे स्वतः ह्या छाप्यात होते की नाही ते स्पष्ट होत नाही. ५ जानेवारी १६५७ चे आणखी एक फर्मान सांगते की मासूरजवळ झालेल्या झटापटीत आदिलसाही सैन्याने शिवरायांच्या सैन्याला पराभूत केले. हा निष्कर्ष थोडा वावगा वाटतो आणि त्याची पडताळणी करण्यासाठी छाप्याचा हेतु काय होता हे बघणे आवश्यक आहे. हा भाग शिवरायांच्या मुलुखापासून बराच दूर आहे. त्यामुळे हा छापा प्रदेश जिंकण्यासाठी नसून खंडणीसाठी असावा हे जास्त संयुक्तिक वाटते. अशावेळी शिवरायांची नीति कमीतकमी जीवहानी व जास्तीजास्त धनलाभ अशीच होती. त्यामुळे ज्याला आदिलशाही फरमानात पराभव म्हटले आहे ती खरतर यशस्वी माघार असावी असे दिसते. मासूरवरील छाप्यात नेमके काय धन मिळाले ते साधनाअभावी कळत नाही. पण आदिलशाही व मराठी सैन्यात झटापटी झाल्या हे निश्चित. हा सगळा प्रकार नोव्हेंबर-डिसेंबर १६५६ मधे झाला. 
संदर्भग्रंथ • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८०५-८०८

Tuesday, December 1, 2015

रघुनाथ बल्लाळला दंडा



शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ )
सांभार : http://www.marathaempire.in/
भाग १४५

शिवाजी राजे दंडा-राजापुरी जिंकतात
जावळी घेतल्यानंतर शिवरायांना थेट कोकणाला हात घालता येत होता. जंजीऱ्याचा सिद्दी आता त्याचा शेजारी झाला होता. १३ ऑगस्ट १६५७ ला शिवरायांनी रघुनाथ बल्लाळला दंडा राजापुरीवर धाडले. ह्या घटनेचा उल्लेख शिवापूर शकावली देते. रघुनाथने ह्या मोहिमेसाठी पाच सहा हजार घोडदळ घेतले होते असे त्यातून कळते.
रघुनाथने आधी तळे-घोसाळे हे दोन किल्ले व त्यांचा परिसर जिंकला. एक दोन ठिकाणी त्याने सिद्दीच्या सैन्याला पळवून लावले. त्यानंतर त्यांच्यात तह झाला. शिवभारतातही ह्या घटनेची पुष्टी मिळते. अफजलखानने सन १६५९ मधे वाईला पोहोचल्यावर लिहीलेल्या पत्रातही ह्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी सिद्दीच्या प्रदेशात केलेले आक्रमण थांबवून ते भाग सिद्दीला परत देण्याची आज्ञा त्यात केली आहे.
सिद्दीला जंजीऱ्यावरून हुसकावून लावायला त्यावेळी मराठ्यांकडे नावीक बळ नव्हते. त्यामुळे रघुनाथ बल्लाळने फक्त दंडा-राजापुरीचा भाग जिंकून घेतला.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८५४-८५५
Website Security Test